पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंतिम वर्ष परीक्षा आणि राजकारण!

इमेज
अंतिम वर्ष परीक्षा आणि राजकारण!       या वर्षांच्या सुरवातीला करोना नावाचं संकट आले अन या मध्ये सर्वांचे च नूकसान झाले. या मध्ये सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे विद्यार्थी, विशेषता अंतिम वर्षाचा विद्यार्थी. कारण एक तर तो नोकरीच्या शोधात होता, वरून हे संकट आणि दुसरे परिक्षा. या मध्येच सरकारने अजून एक ठिणगी टाकली की अंतिम वर्ष सोडून बाकी सर्वांच्या परीक्षा होणार नाहीत. मग अंतिम वर्षाचा विद्यार्थी म्हणू लागला की आम्ही काय पाप केले की आमच्या परीक्षा होणार? सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघून आपला राजकीय डाव साधन्याचा प्रयत्न केला. पण अगोदरच ५ महिन्या पूर्वी सत्ता गेलेला विरोधी पक्ष! यांना यात यश न मिळू देण्यासाठी धडपड करू लागला, मग ते आपल्या केंद्रातील सत्तेचा उपयोग करु लागले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन शिक्षणमंत्री ठाम! नाही म्हणजे नाही!  आता कुठे विद्यार्थी आशेचा श्वास घेत होता, तोपर्यंत विरोधी पक्ष व त्यांच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, रोज डिबेट चालू झाल्या पण या डिबेट ला अंतिम वर्षाचा विद्यार्थी कुठेच दिसला नाही, दिसले ते संघटनांचे कार्यकर्...

एक विचार

एक विचार  सध्या ची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति इतकी वाईट होत चालली आहे की, विकासाची चर्चा न करता, महापुरुषांचे विचार आत्मसात न करता, प्रत्येक जण काही ना काहीतरी वादाचा विषय करत चालला आहे. महापुरुषांचा सन्मान करता येत नसेल तर कमीत कमी अवमान तरी करू नका. बोलायचं असतं एक, अर्थ होतो दुसराच, अन सांगणारा सांगतो तिसराच. कारण लोकांना अर्थ समजुन घेण्यापेक्षा चुकीचा अर्थ कसा निघेल याचीच लोक वाट पाहत असतात. सध्या तर मालिकाच सुरू झाली आहे. एक एक जण महापुरुष, संत यांचे नाव घेऊन त्यांचा अवमान आणि येणाऱ्या पिढीची पण माथी भडकवण्याचे काम करीत चालला आहे. एकीकडे भारत G20 च प्रतिनिधीत्व करताना दिसतोय, म्हणजेच जगाचं प्रतिनिधीत्व करताना दिसतोय, आज जग भारताकडे एका आशेने बघत आहे. सर्वच क्षेत्रात भारताची ताकद आपल्याला पाहायला मिळतेय. कालचच उदाहरण पाहिल तर लक्षात येइल. चिनी सैन्य भारतात घुसत असताना भारतीय सैन्यांनी आपली नव्या भारताची ताकद त्यांना दाखवून दिली. पण राज्यांतील परिस्थिति पाहताना दुःख होत. प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आहे. काल पुण्यात छत्रपती शिवरायांच्या समर्थनात मोर्च...

आदर्श शिक्षक

इमेज
 आदर्श शिक्षक एकदा शाळेतील एका विद्यार्थी याचे घड्याळ चोरी होते. मग तो शिक्षकाकडे तक्रार करतो. कोणीही खरे बोलायला तयार होत नाही. मग शिक्षक सर्व मुलांना डोळ्याला पट्टी बांधायला लावतात व सर्व मुलांना चेक करतात. घड्याळ सापडते व सर ते घड्याळ त्या मुलाला देतात पण कोणी घेतले होते ते सांगत नाहीत.  खुप वर्षानंतर एक पोलीस अधिकारी सरांना भेटायला येतो व त्याच नाव सांगतो. तो पोलीस अधिकारी सरांना विचारतो मी घड्याळ चोरी केली होती, तेव्हा तुम्ही मला शिक्षा का केली नाही. तेव्हा सर जे उत्तर देतात ते खूप समर्पक आहे. सर त्या मुलाला सांगतात तूम्ही ज्या वेळी डोळ्याला पट्टी बांधली तेव्हा मी पण एक पट्टी माझ्या डोळ्याला बांधली होती. कारण मला माझ्या विद्यार्थाला माझ्या नजरेतून कमी करायचं नव्हतं. हे ऐकून त्या पोलीस अधिकारी च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. एक आदर्श शिक्षक कसा असावा याच आदर्श उदाहरण! #Teachersday #शिक्षक दिन #motivational story